पर्यटनाच्या निमित्याने ......
काढून संबंधित ठिकाणी जाण्यापेक्षा त्या ठिकाणी गेल्यावर चहावाल्याला , न्यूजपेपरवाल्याला विचारून माहिती काढणे अधिक सोईचे असते . इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीपेक्षा अधिक सखोल, विश्वासार्ह्य माहिती त्यांच्याकडून मिळते . ज्यामुळे आपली त्या ठिकाणाशी अधिक नाळ जुळते . संबंधित ठिकाण आपले अधिक ओळखीचे होते . अर्थात हा माझा अनुभव आहे . प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो , याची मला जाणीव आहे . जर कोणी इंटरनेटवरून माहिती काढत विविध ठिकाणी आगाऊ आरक्षणे करत जर प्रवासाचे स्वागत करत असेल तर त्याने त्या प्रकारे प्रवास सुरु ठेवणे सोईस्कर आहे . मात्र नव्याने पर्यटन सूर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने मी म्हणतो मार्ग अनुसरणे अधिक उत्तम आहे .
पर्यटनामुळे आपणास विविध गोष्टीचे ज्ञान होते , जे आपणास 100 पुस्तके लेख वाचून देखील मिळणार नाही . मी अनेकदा खिडकी शेजारील आसनावर बसून प्रवास करत असल्याने मला रस्त्याची कामे कशी सुरु आहेत ? हे कळते सध्याचे सरकार आपण आपण रस्त्यासारख्या पायाभूत सेवेवर प्रचंड प्रगती करत असल्याचे सातत्याने सांगते . त्यातील वस्तुस्थितीचा अंदाज आपणास त्यामुळे सहजतेने येतो . त्याच प्रमाणे संबंधित प्रदेशात कोणत्या प्रकारची पिके अधिक घेतली जातात . याचे कोणतेही पुस्तक न वाचता सहजतेने ज्ञान होते . ज्याचा मला माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड फायदा होतो . माझ्यामते पर्यटन म्हणजे आपले अनुभव विश्व अल्पश्या कालावधीत अधिक मोठया प्रमाणात विस्ताराने हे होय . आपणास काय वाटते ? आपली पर्यटनाची व्याख्या काय ? मी तुमची पर्यटनाची व्याख्या जाणून घेण्यास इच्छूक आहे . तुमची पर्यटनाची व्याख्या काहीही असो , तुम्ही पर्यटन कराच
असे मला वाटते . पर्यटनामुळे विविध लोकांना रोजगार मिळतो . सध्याचा मंदीचा काळात सर्वसामान्य व्यक्तीकडून जर मंदी करायची असेल ?,तर मंदी दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणून या कडे बघावे लागेल . तुम्ही पर्यटनाच्या निमित्याने लांबवर जाण्याची आवश्यकता नाही . आपल्या राहत्या घरापासून दोनशे किलोमीटरच्या परिघात तुम्ही फिरले तरी ते पर्यटन म्हणूनच गणले जाईल तर मग कधी बाहेर पडताय पर्यटनासाठी ? ......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा