रेल्वेचे काहीसे उशिरा पडलेले मात्र अतिशय उत्तम पाऊल 'रेल वन ऍप्लिकेशन'
आपल्या भारतातील प्रशासन मोठे अजिब रसायन आहे.नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करताना संबंधित यंत्रणा नक्की कोणता विचार करतात ? याचा अंदाज बांधता येणे भल्याभल्या देखील शक्य होणार नाही अश्या प्रकारचा या यंत्रणांच्या कारभार असतो. मात्र नंतर आलेले अनुभव लक्षात घेत या उपाय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात हेही तितकेच खरे. हे बदल बघितले तर हे बदल आधीच का केले नाहीत ? असा प्रश्न सर्वसाम्यांना नक्कीच पडेल असे या यंत्रणेचे काम असते. अगदी रेल्वेसारख्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीचा उपक्रम देखील या कचाट्यातून सुटलेला नाही रेल्वेचे 'रेल वन हे ऍप्लिकेशन' हे याचे एका उत्तम उहदाहरण म्हणता येईल रेल्वेचे अनरिझर्वड तसेच रिझर्वेशन करणे , गाड्यांची सध्याची स्थिती बघणे आपल्या रिझर्वेशनची स्थिती बघणे,पास काढणे दोन स्टेशन दरम्यान किती ट्रेन धावतात त्यांची डब्यांची स्थिती काय आहे ? प्रवासादरम्यान खाण्याची सोय करणे,रेल्वेकडून काही मदत मागवणे, रेल्वेच्या कारभाराबाबत तक्रारी करणे, प्रवासादरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाची सोय करणे, रेल्वेबाबतची छान छान...