पोस्ट्स

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )

इमेज
           मी एसटी बसचा वापर करतो,हे एव्हाना आपणास माहिती असेलच.एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात.काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत:180अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात. असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला.माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठी          तर मित्रांनो, पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते. मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती.त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती.त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गेवराई बसेस कोठून सुटतात असे विचारल्यावर  त्यांनी माळीवाडा असे उत्तर दिल्या...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ (माझे आवडते पर्यटनस्थळ )

इमेज
मला अनेकजण विचारतात . अजिंक्य,  तू इतके फिरतो, त्यातील तुझे सर्वात आवडते पर्यंटन स्थळ कोणते ? माझे आजचे लेखन या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. तर मित्रांनो माझ्या आवडीची अनेक स्थळे आहेत.काही स्थळे मला तिथे जाण्याची आणि राहण्याची  सोय फार उत्तम असल्याने आवडली आहेत. काही स्थळे तेथील निसर्ग सौदर्यांमुळे आवडली आहेत. तर काही तिथे गेल्यामुळे मिळणाऱ्या शांततेमुळे आवडली आहेत. तरी या सर्वांचा एकत्रित विचार करता मला आवडलेले सर्वात उत्तम स्थळ आहे . गुजरातच्या डांग जिल्हयात असणारे सुब्बीर या तालुक्या मुख्यालयाच्या जवळ असणारे शबरीधाम - पम्पा सरोवर  हे ठिकाण .या ठिकाणी मी गेल्या वर्षी 2025 ला एप्रिल 13 रोजी भेट दिली. नाशिकहून गेल्यास एका दिवसात सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे .ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता येईल,मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव देखील एका तासात सहज बघून होतो त्यामुळे जायला  येयला प्रत्येकी २ तास स्थलदर्शनाला एक ते दीड तास आणि अन्य एक तास सात ते आठ तासात आपले हे ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८

इमेज
मी माझ्या फिरण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर करतो जर एसटी बसचा वापर शक्य नसेल तर मी खासगी बस वाहतूकदारांचा वापर करतो . अन्य खासगी वाहतूक साधनांचा वापर मी जवळपास शून्यच्या बरोबरीने वापर करतो. हे माझ्या प्रवासाबाबतच पुरेशी माहिती असणाऱ्या अनेकांना एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल. जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीला मी एसटी बसचा चाहता आहे हे समजते त्यावेळी  काही वेळा  काय हे एसटी आवडू कशी शकते ? एसटी बस पेक्षा इतर प्रायव्हेट ऑपरेटर खूप ऊत्तम सेवा देतात. त्यांचा वापर करायला  काय जाते. पॆसे जवळपास सारखेच लागतात. या प्रतिक्रयेला मला सामोरे जावे लागते . काही जणांचा रोख सार्वजनिक बसवाहतुकी पेक्षा स्वतःचे वाहन काढून फिरण्यास प्राधान्य देण्यास असतो त्यांच्यामते कुठे बसची वाट बघायची बस ठीक ठिकाणी थांबत जाणार त्यात विनाकारण वेळ वाया जाणार तसेच बसमधील सहप्रवासी कसा असेल तो विक्षिप्त असेल तर काय सर्व प्रवाशाची मजाच जाणार . त्या पेक्षा स्वतःचे वाहन काढायचे हवे त्या ठिकाणी थांबायचे ते देखील हवे तेव्हडा वेळ .पूर्णतः स्वतःच्या मानाने फिरायचे   हे दोन्ही दृष्टिकोन त्यांच्या त्...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक 7

इमेज
हा मजकूर वाचताना तूमच्यापैकी अनेकांच्या मनात माझ्याविषयी एकच ओळख ठळकपणे पुढे आली असेल ती म्हणजे मी प्रामुख्याने एसटी बसच्या माध्यमातून केलेल्या माझ्या सोलो ट्रिप्स. आजपर्यंत पूर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता, जिथे जिथे आपली एसटी पोहोचते, त्या महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात मी अनेकदा भटकंती केली आहे. या प्रवासात नुसती ठिकाणेच नाही, तर माणसे, संस्कृती, अनुभव आणि आठवणी यांचाही साठा जमा झाला. या प्रवासादरम्यान मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील काही अनुभव मी यापूर्वी तुमच्याशी शेअर केले आहेतच. मात्र अजूनही काही अनुभव असे आहेत, जे आतापर्यंत सांगायचे राहून गेले होते.तेच न सांगितलेले, वेगळे आणि लक्षात राहिलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे हे लेखन मी फिरायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यापैकी काही ठिकाणी एसटीची एक पेक्षा जास्त बसस्टँड असतात.त्यामुळे  बसचे व्यवस्थापन करायला एसटी प्रशासन करायला सोपे जाते तसेच  माझ्या सारख्या फिरणाऱ्या व्यक्तीला हे विविध प्रकारचे अनुभव देणारे ठरते. गावात आल्यावर जर पूढे जायचे अस...

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे

इमेज
  आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.  लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. .त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो  हो,, !  गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते .तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध  केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्...

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.      वलसाड...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...