पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )
मी एसटी बसचा वापर करतो,हे एव्हाना आपणास माहिती असेलच.एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात.काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत:180अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात. असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला.माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठी तर मित्रांनो, पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते. मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती.त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती.त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गेवराई बसेस कोठून सुटतात असे विचारल्यावर त्यांनी माळीवाडा असे उत्तर दिल्या...