पर्यटनाच्या निमित्याने ......(भाग २ )
केल्याने देशाटन शहाणपण येते असे आपल्याकडे म्हंटले जाते . आता ते कितपत खरे वादाचा मुद्दा होऊ शकतो .मात्र विविध ठिकाणी फिरल्याने आपल्याकडे अनुभव मात्र खूप येतो याबाबत दुमत नसावे . मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीच्या विविध योजनांचा यथेच्छ फिरत आहे त्यामुळे या बाबत मी खात्रीने सदर गोष्ट १०० % खरी असल्याचे सांगू शकतो असो मी एसटीच्या विविध योजनेचा फायदा घेत आतापर्यंत विदर्भाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधील इंदोर परिसर , गुजरातमधील वापी वलसाड सुरत व्यारा , सोनागढ चिखली सापुतारा अंकलेश्वर , भरूच , बडोदा आदी ठिकाणी फिरलो आहे या प्रवासात चमत्कारी घटना अनुभवल्या आहेत . मी रत्नागिरी जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्था कशी आहे याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरून घेत असताना माहिती घेत असताना रत्नागिरीपासून नजीकचा विमानतळ हा पणजीच्या विमानतळ असल्याची माहिती मला मिळाली तुम्ही म्हणाला यात गंमत ती काय ? तर मी त्यांना सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर म